Monday, 4 July 2016

काळ

काडी काडी आणून जोडून
शाकारलं पानांनी,
ऊब देणारं इवलं घरटं
विणलं त्या दोघांनी
जडावलेल्या पक्षिणीचं
देहभान हरपलं
मायेच्या पंखांखाली
शांत कोणी विसावलं
न थकता आणू लागले
आई बाबा चिमणचारा
घरट्यामधल्या चोचींसाठी
दिवसभर त्यांच्या फेऱ्या
घरट्यावरती डोकावता
लालचुटुक कवळ्या चोची,
झेपावला क्रूर काळ तो,
तीक्ष्ण नखांनी त्यांना टोची
एक पळवले, गेले दुसरे
हतबल, दुर्बल फक्त आकांत,
कितीक भिंती, किती पहारे,
नको नको तिसऱ्याचा अंत
काल मारल्या बऱ्याच फेऱ्या
आज पक्षिणी कुठेच नाही,
काल झोपलं तिचं पिलू,
अजूनही उठलंच नाही 

No comments:

Post a Comment